पोस्ट्स

ऊस व राजकारणाच्या फडातील कोंबडीबाज बिबटे

इमेज
     हे एक रुपक असले तरी याचे वास्तव मात्र खूप जळजळीत आहे.  नजिकच्या भविष्यकाळात यावर व संभाव्य धोक्यांवर उपाय होईल अशी चिन्हे नाहीत.  परिणामी आजचे जंगल आणि राजकारण रिकामे ते रिकामेच राहील.  पोकळ आशावाद अगतिक व भोळ्या समाजाला बळीचा बकरा बनवत राहील. गावोगावी राजकारण आणि उसाच्या फडात कोंबडीबाज बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  उसाच्या फडातील बिबट पोटासाठी आणि राजकारणाच्या फडातील ‘ बिबट ’ नोटांसाठी आटापिटा करत आहेत.  नोटांची गरज सगळ्यांना असते, कारण नोटांचा प्रश्न हा पोटाच्या प्रश्नाशी निगडीत आहे. पण सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांची अवस्था जशी, ‘ घर का ना घाट का ’ होते तशी बिबट्यांची अवस्था, ‘ न जंगल का न जमीन ’ का अशी झाली आहे. दोन्हीकडील स्थिती हादरे देणारी आहे.  तुटलेल्या जंगलाने बिबट्यांचा लुटलेला संसार त्यांनी उसाच्या फडात थाटला.  तिथेच पिलांना जन्म दिला आणि पोटासाठी शेती लगतच्या वस्त्यांवरती हल्ला केला, अशी ही इतकी सहज सोपी कथा नाही.  जंगल तुटीने घर हरवलेल्या बिबट परिवाराची व्यथा आणि बिबट्यामुळे आपलं माणूस गमावून उध्...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकसंख्या विषयक विचार.

इमेज
       डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुमुखी व्यक्तिमत्वात त्यांचे अर्थशास्त्र व लोकसंख्या विषयक विचार त्यांचा दृष्टेपणा दर्शविणारे आहेत.   बाबासाहेबांनी तत्कालीन स्थितीमधे कुटुंब नियोजनाचे महत्त्व स्पष्ट केले होते.   या अत्यंत महत्त्वाच्या व दूरगामी परिणाम करणाऱ्या मुद्द्यंवर त्यांनी अभ्यासपूर्ण व सकारात्मक प्रयत्न केले होते.   लोकसंख्या वाढ ही समस्या कायम आहे.   आता या समस्येच्या स्वरुपात काळानुरुप बदल झाला आहे.   काही देश व समाज यांच्या दृष्टीने लोकसंख्या वाढ उपयुक्त बाब आहे किंवा वर्चस्ववादासाठीचे शस्त्र बनले आहे.   मात्र जगण्याचे शास्त्र यामुळे बाधीत होत असेल तर या संकल्पना लोकोपयोगी होऊच शकत नाहीत.           दलितांचे नेते, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, स्त्रियांचे कैवारी, अर्थशास्त्री, समाजशास्त्री, कृषीधोरणाचे चिंतक, अशा विविध पैलुंचे एकत्र स्वरुप म्हणजे बाबासाहेब होत.   देशाला जलसाक्षरता आणि उर्जा साक्षरतेची गरज आहे असे त्यांनी १९४२ सालीच सांगीतले होते.   देशाची अफाट वाढणारी लोकसं...

माझी लीव्ह व्हॅकन्सी..

इमेज
                                                    प्रवास सुखाचा झाला.   २६ जानेवारीलाच लीव्ह व्हॅकंन्सीवर हजर होण्याचा उत्साह.   माणसं कशी असतील याचं दडपण.   मात्र मुख्याध्यापक जाध व सरांनी हसतमुखाने स्वागत केलं आणि दडपण गेलं.   इथे अधिकाधिक श्रवणभक्ती करण्याचा सल्ला अनुभवींनी दिला होता.   सुरुवातीला कार्यालयातच ओळखपरेड झाली.   मुख्याध्यापकांच्या सांगण्यानुसार अंघोळीसाठी शिपायानं पाणी गरम करायला ठेवलं.   प्रयोगशाळेतील बाथरुम मधे कडक पाणी अंगावर घेतलं.   खूप बरं वाटलं.   मुख्याध्यापकांनी गोड सरांशी परिचय करुन दिला.   गोडसर नावासारखेच गोड मृदुभाषी सौम्य व्यवक्तीमत्व.   मातृहृदयीच म्हणाना.   यांच्यावर माझी पुढील व्यवस्था सोपवली.   त्यांनी डबा आणलाय का विचारलं आणि संध्याकाळी जेवणाला येण्याचं आमंत्रण दिलं.   “ खोली पाहून हाताने करुन खा, तो पर्यंत साठक सर डबा देतील .”...