पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कारगिल, हिमनगाचे एक टोक

इमेज
कारगिल, हिमनगाचे एक टोक कारगिल युद्ध भारत व पाकिस्तान दरम्यान १९९९ च्या उन्हाळ्यात झालेले मर्यादित युद्ध होते.   यात युद्धरुपी हिमनगाचे टोक काश्मिर मध्ये व्यक्त झाले होते.   त्या वेळी दिस­­लेल्या त्या हिमनगाचा जलमग्न भाग चीनी युद्धज्वारपासून नेपाळी कागाळ्या आणि पाकिस्तानच्या सततच्या आगळीकीतून दिसून येतो . याचा विस्तार मोठा आहे. २६ जुलै.   कारगील विजय दिवस.   पाकिस्तानी षडयंत्राने रचलेला डाव भारतीय विरांनी उधळला, ती ही तारीख.   ही बाब फक्त एवढीच नाही.   त्या युद्धाच्या पोटात धुमसणारे अनेक घटक आहेत.   १९९९ च्या कारगील युद्धाच्या आधी १९८५ साली जणू याची रंगीत तालीमच झाली होती.   त्यावेळीही व नंतर झालेल्या युद्धाने देशाला चांगलेच झुंजवले होते.   आता ड्रॅगनची समस्या सीमेवर नेहमीप्रमाणेच डोके वर काढून बसली आहे . एकूणच काय तर कारगील हे एक हिमनगाचे टोक होते .   दहशतवाद, भारताचा विकास रोखण्यासाठी प्रयत्नशील तथाकथित सभ्य शक्तींचे अदृश्य हात, पाकिस्तानचा भारत द्वेष आणि चीनची दुष्ट बुद्धी, भारतात राहून विदेशी हातांना मजबूत करण्याचे मनसुबे असलेल...

पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे

इमेज
पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे आण्णा भाऊ साठे (मूळ नाव तुकाराम.) (१ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९ ) वडिलांचे नाव - भाऊ सिधोजी साठे, आईचे नाव - वालबाई होते. जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा जि. सांगली).   ज्यांची हातवरची पोटं असतात, ते जगाचे पोट भरत असतात.  त्यांच्या कष्टातूनच इतरांच्या जगण्याची साधन-सामुग्री तयार होत असते.  त्यात सर्व क्षेत्रातील कष्टकरींचा समावेश होतो.  चीनी व्हायरसने जग स्तब्ध झाले आणि हातावरची पोटं असणारा वर्ग हवालदिल झाला. कारखान्यांची चाकं थांबली.  उलाढाल ठप्प झाली.  आधीच संकटं तशात कोरोनाच्या हल्ल्याच्या निर्बंधांमुळे परतणाऱ्या प्रवासी मजुरांचे लोंढे रस्त्यावर दिसू लागले.  ही स्थिती फक्त भारतातच होती असे नाही तर जगभर हेच चित्र होते.  ज्यांच्या हातांवर पृथ्वी तरलेली आहे तो हा श्रमजीवी वर्ग.  आज आण्णा भाऊ साठेंचा स्मृतीदिन.  आण्णां भाऊंनी सांगीतलेल्या या वर्गाचे हात पुन्हा आपापल्या कामांना लागल्याशिवाय पृथ्वीचे अर्थचक्र फिरणार नाही.  प्रगत देशांमध्ये रोबोट असतील, पण तिथेही श्रमजीवीं...